Thursday, July 19, 2007

"जी गोष्ट भारतात शक्य आहे पण चीन मधे नाही "

विक्रमा अशी कोणती गोष्ट आहे की ज्यात भारताची बरोबरी चीन करु शकत नाही ? भारतात जे जमते ते चीनमधे जमत नाही ? जी गोष्ट भारतात शक्य आहे पण चीन मधे नाही ? वेताळाने गुगली टाकत प्रश्न विचारला. माझा प्रश्नाचे उत्तर दे नाहीतर .......

वेताळा ऐक तर, तु २३ जुनचा साप्ताहीक सकाळ ( चीनमधे हे कसे जमते ? ) वाचलेला दिसतोस. हा प्रश्न त्याचाच परिणाम आहे. असो. तुला ऐकुन ठावुक असेलच चीनने तिबेटच्या पठारावर अत्यंत प्रतीकुल परीस्थीतीत रेल्वे मार्ग बांधला, त्यांच्या कडे ४३२ किलोमीटरच्या वेगाने धावणारी मॅग्लेव्ह ट्रेन आहे .

विक्रमा आता तु मला परत या रेल्वे वर लेक्चर देणार आहेस काय रे ? आपल्याकडे कोणत्या परिस्थितीत कोकण रेल्वे बांधली विसरलास काय रे ? आता बोरीवली-विरार मधला चौपदरी मार्ग ही बांधुन पुरा होतोय ना ? होणार आहे ना ?

अरे वेताळा मला रेल्वे लाईन नव्हे तर त्यावरील पादचारी पुलाबद्द्ल तुला काहीतरी सांगायचय. मुंबापुरीत, चरनी रोड नामक रेल्वेस्थानका बाहेरील पादचारी पुल बांधल्यानंतर हाताच्या बोटावर मोजता येतील येवढ्याच वर्षात मोडकळीस आला. आता तो का व कसा जीर्ण झाला हा विषय वेगळा. मग तो पाडुन त्या जागी नवीन पादचारी पुल बांधायला घेतला. नवा पुल "स्टेट ऑफ आट्‌र्स " असणार होता. या पुलावरुन दररोज लाखो रेल्वे प्रवासी ये जा करीत असत, येथला रस्ताही दक्षिण मुंबईतुन बाहेर पडण्याचा मुख्य रस्ता. मग ते हजारो, लाखो, प्रवासी सरळ रस्तावर, रस्ता पार करण्यासाठी येवु लागले, वाहतुकीस अडथळा होवु लागला, अडथळे, अडचण सर्वांनाच.

अभिमानाची गोष्ट म्हणजे अत्यंत विक्रमी वेळात या पुलाचे बांधकाम पुर्ण झाले, त्याबद्दल लोकप्रतिनीधींनी स्वतःच स्वताला शाबासकी देत अभिमानाने व गर्वाने पाठ थोपाटुन घेतली,

विक्रमा माझ्या प्रश्नाचे हे उत्तर नव्हे.
वेताळा ऐक तर खरे, हा बांधकामाचा कालाविधी फक्त जवळ जवळ २१ महीने म्हणजे पावणे दोन वर्षे होता. थोडेसे कमी जास्त, इकडे तिकडे.

आता सांग, ही दिरंगाई, हा विलंब , हा जनतेचा सोशीकपणा, ही कॉंट्रक्टर व संबधीताची बेपर्वायी, केवळ भारतातच शक्य आहे, नाही का ? चीनला हे जमणे व परवडणे नाही असे तुला वाटत नाही काय रे ?

तु बोललास व मी चाललो, या पुलावरुन.


हरे कृष्णजी

No comments: